Sunday, 30 August 2015

वळू (Highway च्या निमित्ताने पुनच्छ)

हायवे च्या प्रसिद्धी च्या निमित्ताने कुलकर्णी बंधू (आडनाव बंधू फक्त) चला हवा येऊ द्या (CHYD ) मध्ये आले होते (सध्या tv वर हाच  कार्यक्रम माझ्या दृष्टीने बघण्यालायक आहे) ... त्यांच्या आधीच्या सिनेमांवर CHYD च्या टीम ने विडंबन केले होते देवळू आणि आणि अजून एकदा त्या सिनेमांचे पारायण करण्यात आले... हे दोन्ही सिनेमे माझे अत्यंत आवडीचे आहेत आणि एकमेव कारण म्हणजे माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या खेडेगावातील जीवनाची आणि व्यक्तिरेखांची अत्यंत मिश्किल पद्धतीने पेश केलेली अदाकारी .... त्यातल्या त्यात ही वळू माझ्या जास्ती जवळ आहे म्हणूनच ह्यातील काही पात्रांवर मला लिह्सावेसे वाटले कारण आपले म्हणणे लिखित किंवा चर्चित (म्हणजे गप्पांच्या) स्वरुपात समोर पोहोचवता येते त्यातील एका समुद्रापार गेल्याने चर्चित हा पर्याय सध्या बंद आहे .....म्हणून हा दुसरा (sorry पहिला) पर्याय .... आणी हे वाचल्यावर कदाचित तुम्हाला हे वळू पहायची इच्चा झाली तर माझे लिखाण यशस्वी ह्या प्रकारात मोडेल आणि समीक्षक म्हणून काम करण्याचा पर्याय हि माझ्यासमोर उभा राहील ;) ;)
थोडक्यात वळूचं कथासार म्हणजे कुसवडे  गावात, एक वळू आहे,  बैल, जो सहसा एक पवित्र आणि देवाला वाहिलेला असतो ज्याची जवाबदारी गावावर असते... पण अलीकडे, वळू फार आक्रमक झालाय   गावात घडणाऱ्या प्रत्येक गोंधळास आणि नुकसानीस वळूस जवाबदार धरले जाते ... आता वळू पकडणे म्हणजे गावात सत्ता प्रस्थापित करण्यासारखे अशा थरास प्रकरण गेले आहे आणि काही काठावरच्यांना वळू च्या निमिताने स्वतःचा स्वार्थ साधायचाय.
चित्रपटात दोन नेत्यांमधला संघर्ष,  ह्या सगळ्या घडामोडीत फुलणारी प्रेम कथा; एक माहितीपट करू इच्चीणारा हौशी नवशिक्या तरुण दिग्दर्शक ; एका धार्मिक कार्याप्रमाणे ह्या अनागोंदीचे नेतृत्व करणार फोरेस्ट  आणि वळूचे मन समजून असलेली गावाने बहिष्कार घातलेली  कोण एक वेडी  स्त्री ह्या सगळ्यांचा एक कोलाज आहे
 वळू मध्ये जीवन्या म्हणजे गिरीश कुलकर्णी हा सरपंचाचा 'नारायण' दाखवलाय.... गावाला वाहून घेतलेला जीवन्या,  .सरपंचाचा खास माणूस, पण एकदम सड कि फट, बोलताना कसली ही आणि कोणाची ही भीड बाळगणारा , साधारण अंदाज घेतला तर अशी माणसं असतात आपल्या अवती भवति , हा एकमेव प्राणी असा की ज्याला वळूच्या त्रासाच्या नावाखाली कसलं ही काम करून घ्यायचं नाही, फक्त गावाला असलेल्या वळूच्या त्रासातून मुक्त करायचं ..... पण हा जीवन्या जितक्या बेरक्या आहे तितकाच हळवा आहे  आणि एकदम मनाला भिडणारा आहे...अभिनेता म्हणून पहिलीच भूमिका सकारात असताना गिरीश कुलकर्णी जीवन्या इतका लाघवी केलाय की दिग्गजांच्या भाऊ गर्दीतही भावतो ...

सरपंच आणि त्यांची सौ हे आणखीन वल्ली ....गावाला पूर्णतः त्यांनी स्वतःच्या कह्यात ठेवलंय... विरोधकांना काही करून दाखवायची संधी ही नाही द्यायचीय ....म्हणूनच वळू चा मुद्दा ऐरणीवर आल्यावर ताबडतोब त्यांनी सरकार आणि वन विभागाची मदत मागितली आणि गावातला तरुण विरोधक आबा ह्याच्या परस्पर मुसक्या बांधल्या .... बरं एवढं सगळंअसून ही स्वतःला मिरवून घ्यायची हौस काही कमी नाही.... गावात documentry काढण्याचा कार्यक्रमाच्या आरंभी नारळ फोरेस्ट च्या हस्ते वाढवणार म्हटल्यावर ' आम्ही यायचं की नाही' हे वाक्य म्हणजे कळस आहे आणि हे वाक्य म्हणताना त्यांनी केलेला अभिनय निव्वळ दाद देण्याजोगा ... सत्तेमुळे आत्ममग्न झालेल्या व्यक्तीचं प्रतिबिम्बच... आणि त्यांच्या सौ, सरपंच बाई, एकूणच संसारातून निवृत्त झाल्यासारख्या (जे साधारण ५५-६०व्य वर्षी कुठल्याही संसारात होऊ शकतं) पण हातातून सुटत काही नाही आणि वय झालं तरी  मिरवणंही सुटत नाही ... त्या documentry च्या कार्यक्रमाच्या वेळी नारळ देताना बाई अगदी लहान नारळ शोधून काढतात आणि स्वतः देवळात स्वतःची घरी येत नाही म्हणून नथ बीथ घालून एखाद्या मंगल प्रसंगी जाव्या तशा स्वतः देवळात स्वतःची documentry काढायला जातात... अशाच एका प्रसंगी गावातला एक जण फिर्याद घेऊन येतो ....त्या वेळी सरपंच त्याला म्हणतात आपण चहा घेऊन जाऊ पण हा गडी गरम झाला  असल्याने चहा बिहा नको म्हणतो तेव्हा बाईंच चहा किती कप टाकायचा हा आलेला प्रश्न म्हणजे त्यांच्या कंजूस स्वभावाची झलक देऊन जातो आणि त्या थोड्याशा तणावाच्या प्रसंगी ही हास्याची लकेर उमटवून जातो.

एकंदरीतच documentry (वळू ला पकडण्या आधी त्याच्या विषयी माहिती काढण्याचा प्रयत्न) हा गावातल्या लोकांचा स्वभाव वैशिष्ट्य दाखवण्यासाठी उत्तम रीतीने वापरलाय आणि ती documentry वळू ची राहता ती गावकर्यांची documentry होऊन जाते.
आबा हे character म्हणजे अर्क आहे .... गावातलं 'तरुण नेतृत्व' ....सरपंचांचा विरोधक ...bullet आणि ray- ban ही खास ओळख आणि असं कोणीतरी गावात असतंच.... 'वळू'च्या राजकारणात आपण अण्णा (सरपंच) च्याआधी वळू ला पकडून अण्णाना शिकस्त देऊन गावाला आपल्या कह्यात आणावे म्हणून आबाचे प्रयत्न ...त्यासाठी खोटी अफवा उठव, स्वतःच दावे आणून रात्रीस (ray-ban सह) वळू ला पकडायला जा असले  कारनामे चालू असतात .... आबा हे पात्र नंदू माधव ने खास रंगवलंय....   फोरेस्ट आबाला 'लंगडी गाय' समजून  अगदी सहज पणे बोलून जातो उद्या सकाळी आपण मिळून वळू पकडू तेव्हा आबा ने 'ओके ना ' म्हणून जी प्रतिक्रिया दिलीय ती निव्वळ दाद देण्याजोगी ....त्याच्या सगळ्या भाव भावना एका वाक्यात समोरच्या पर्यंत (पक्षी प्रेक्षकापर्यंत) पोहोचतात ...climax च्या वेळी फोरेस्ट उत्साहात इंग्लिश मध्ये सूचना देत असतो आणि लोक थोडा गोंधळ घालत असतात त्या वेळी आबाला त्यांना आवरायला सांगतो त्या वेळी आबा हि एकदम उत्साहात आपल्या ला इंग्लिश येतं हे दाखवण्यासाठी hey don't बोलून  पुढे काही सुचल्याने थांबतो त्या वेळचा अभिनय  निव्वळ अप्रतिम ... तो प्रसंग मी किती तरी वेळा पाहिलाय त्याची कितीही आवरताना अजून होऊ शकतात .....

तसच गावातलं एकमेव ब्राम्हण कुटुंब  जे सर्वत्र पाहायला मिळतं त्या प्रमाणे सगळ्या पक्षांना सांभाळून असतं ..आणि साधारण ब्राम्हण कुटुंबात पाहायला मिळतं त्या प्रमाणे बायकोचा वरचष्मा असलेलं कुटुंब, तसाच तो सुरेश कामधंदा सोडून आबा ला वाहून घेतलेला आणि त्या मुले बायकोच्या रोषाला बळी पडलेला, आणि बायकोच्या इच्छेनुसार पोरीच्या नाकाची डॉकुमेंत्र्य व्हावी म्हणून अर्ध्या रात्रीत बाहेर पडलेला , संगी आणि शिवा हे गावातले love birds आणि त्यात ही स्वतःची शेती सोडून शहरात रिक्षा चालवून पैसा कमावण्याच्या विचारात असलेला  शिवा हे कुठेही गेलं तरी chatkan आढळू शकतात .... लपून छपून प्रेम करणारे bollywood  ने प्रेरित होऊन पळून जाण्याचा प्लान करणारे संगी शिवा काय किंवा जीवन्याची आई , वेडी जनी (कुठल्याही गावात एखादी तरी वेडी व्यक्ती असतेच आणि माणसांनी टाकून दिएल पण जनावरांनी साथ  दिल्याने त्यांच्यात रममाण झालेली) , गावातला सर्वर ज्येष्ट , आदरणीय मार्गदर्शक आजा ह्या व्यक्ती ही अगदीच common  कुठल्याही गावात आढळणाऱ्या .....आणि ह्या सर्व व्यक्ती आपल्याच अवतीभवती आढळतात थेट आपण रिलेट करू शकल्यामुळे कायम लक्षात राहिल्या ...

संपूर्ण चित्रपट पाहताना चेहऱ्यावर हास्यरेषा कायम राहते आणि ती मोठी होत जाते पण लहान कुठेच होती नाही खूपच वेगळा अनुभव ह्या सिनेमाने दिल्यामुळे माझ्या अत्यंत जवळच्या  चित्रपटांपैकी एक...

देऊळ मध्ये ही नानाचा आमदार, कळसूत्री बाहुली प्रमाणे असलेली सरपंच बाई, नवीन उभे राहणारे नेतृत्व, शहरात राहिलेला म्हणून शहाणा असं audience , गावच्या टपरीवर निव्वळ वेळ घालवणारी तरुण टाळकी , तरुण नेतृत्वास हवा देणारा पत्रकार ही नेहमीच आढळणारी माणसं, त्यांच्या विषयी पुन्हा केव्ह्तरी

अशी अविस्मरणीय व्यक्तिमत्व पु.लंच्या गणगोत किंवा व्यक्ती आणि वल्ली नंतर प्रथमतःच साकारली गेली असतील असं मी विधान केल्यास अतिशयोक्ती ठरू नये...


आणि म्हणूनच त्यांच्या Highway बद्दल खूप खूप उत्सुकता आहे पण थोडी कळ सहन करावी लागणार आहे  ह्याचा खेद ही  वाटतोय .... असो पण गिरीश आणि उमेश कुलकर्णी ह्यंच्या HIGHWAY वरील प्रवासास खूप खूप शुभेच्छा आणी ही सेल्फी नक्किच काळजात आरपार घुसेल ही अपेक्षा

Monday, 15 June 2015

अरण्यानुभव

माझ्या मित्राचा मेसेज आला की मे महिन्यात ते व्याघ्रगणती साठी नागझिरा अभयारण्यात जात आहेत आणि मी थोडा अस्वस्थ झालो ..... ओमान मध्ये आल्यापासून मी एक गोष्ट फार मिस करतोय ती म्हणजे भ्रमंती ..... भारतात असताना दर २-३ महिन्यातून कुठे न कुठे जाणे  व्हायचेच ...मित्रांबरोबर म्हणा, कुटुंबासमवेत म्हणा ... पण इथे त्या गोष्टीना आळा बसलाय ...एक तर फिरण्यासारखं फार नाही आणि दुसरं म्हणजे स्वतःच वाहन नाही अजूनपर्यंत तरी ...असो ....तर तो मेसेज वाचून फक्त पुढच्या वर्षी आपण परत जाऊ रे असं म्हणून समाधान करून घेण्याविषयी पर्याय नव्हता ... पुढचे दोन तीन दिवस मी माझ्या मागच्या जंगल सफरींच्या आठवणीत हरवून गेलो

लहानपणी मोगली पाहून साधारण प्रत्येकाच्याच मनात जंगलाविषयी एक उत्सुकता निर्माण होते आणि गोष्टी ही साधारण पक्षी - प्राण्यांच्या ऐकवल्या जायच्या...आणि जसे मोठे व्हायला लागतो तसे  Discovery आणि NGC ने wild life विषयी उत्कंठा पार शिगेला पोहोचते ..माझ्याही बाबतीत असे घडले पण हे सध्या कसे करता येईल ह्या विषयी फार माहिती नसल्याने म्हणा किंवा awareness नसल्याने म्हणा ह्या सर्व गोष्टी फक्त मनातच राहिल्या ...आणि मग  ती सगळी तहान  फक्त पुस्तकं/लेख  आणि tv ह्या वरच भागवू लागलो ....मग जस जसा स्वावलंबी झालो आणि जस जसे विश्व विस्तारत गेले  तसे सम आवड असणाऱ्या लोकांशी मैत्री वाढत गेली आणि अशाच काही मित्रांबरोबर एकदा कान्हाला जायची संधी मिळाली .... पहिलाच अनुभव खूप झकास होता... आम्ही जेमतेम एक दिवस जंगलात होतो आणि दोन सफारी (सफारी म्हणजे जंगलभ्रमंतीसाठी साठी सरकारतर्फे प्रश्क्षित आणि परवानाधारक चालक आणि guide अशा २ व्यक्तींनी सज्ज असे वाहन) बुक केल्या होत्या ...सकाळची आणि संध्याकाळची ....सकाळी तर हरणं, गवे आणि मोर ह्यांच्याशिवाय फार काही नजरेस नाही पडलं आणि संध्याकाळी ही जंगलच्या राजाने आम्हास हुलकावणीच द्यायचं ठरवलं होतं आणि जसजशी आमची जीप जंगलाच्या बाहेर पडायची वेळ जवळ आली  आणि मनात नैराश्य दाटू लागत असताना  चमत्कार घडावा  त्याप्रमाणे बिबट्या, साक्षात वाघोबा आणि जंगली कुत्रे ह्यांनी दर्शन दिले आणि नैराश्याची जागा शब्दातीत आनंदाने घेतली ...खूपच अविस्मरणीय अनुभव होता

पुनश्चः हा अनुभव घेता यावा व कुटुंबास ह्या आनंदात सहभागी करून घ्यावे ह्या उद्दिष्टाने परत एकदा कान्हास जायचे ठरवले ....तसे ही सौ. नी नवीन कॅमेरा भेट दिला होता व तो कॅमेरा मुक्तछंदात वापरण्यासाठी जंगलापेक्षा दुसरी उत्कृष्ट जागा नसावी आणि पक्षी प्रेमाचे ('पक्षी,' फोटोग्राफी) चे भरते आले होते आणि काही पक्षी ओळखावयास ही शिकलो होतो .... एकंदरीत कान्हास जाण्यासाठी बरीच कारण पाठीशी होती...
 कान्हास आमचा मुक्काम ३ दिवसांसाठी होता...आम्ही सकाळची जंगल सफारी घेतली होती आणि संध्याकाळी nature  walk , आदिवासी वस्तीस भेट, लोकनृत्य वगैरे साठी राखीव होती...साधारण सूर्योदयाच्या वेळेस आम्ही जंगलात भ्रमंतीसाठी निघायचो.... आमच्या बरोबर आमच्या जिप्सीत डच जोडपे होते... आम्ही राहिलेलो त्याच resort मध्ये  उतरले होते.. साधारण नोव्हेंबर महिना असेल एवढी कडाक्याची थंडी होती की विचारता सोय नाही,.... मुंबईत एवढ्या वर्षात कधीच अनुभवली नव्हती..आम्ही  घोंगडी घेऊन आणि गरम पाण्याच्या पिशव्या सोबत घेऊनच जायचो... तरी ही फोटो काढण्यास हात घोंगडीच्या बाहेर काढावयास धजावायचो नाही....आणि दाट  जंगल असल्याने सुर्य दर्शन व्हावयास किमान ८ तरी वाजायचे आणि थंडी कमी होण्यास १० तरी....आणि ११ पर्यंत तुम्ही जंगलातून बाहेर पडायचे असते....आमची अशी  अवस्था व्हयाची तर प्राण्याची काय सांगा.... थोडक्यात व्याघ्रदर्शन होणे कठीण च होते.... कारण जंगलात प्राणी पक्षी साधारण पाणवठ्यावर च दिसतात ..... थंडीच्या दिवसात ते तरी कशाला लवकर बाहेर पडतील...अगदीच एखादा भक्ष्याचा शोधात निघाला तर...


सफारीला निघण्याच्या आधी naturalist म्हणून रेसोर्त मध्ये असलेल्या देशपांडेनी प्राथमिक माहिती दिली आणि आमची उत्सुकता खूपच वाढवली .... मुन्ना नावाच्या वाघाविषयी त्यांनी फार उत्सुकता निर्माण केली....त्यच्या कपाळावर म्हणे cat  नाव तयार झालाय रेघानी .....एवढंच नव्हे तर कान्हातला लांबी ने सगळ्यात मोठा .. आम्हाला आता तर तो पाह्याचाच होता .... जंगलात जायचं ते वाघासाठीच हा समज पक्का आहे आणि तिथले गाईड आणि चालक पण वाघाच्याच माघावर निघतात ..... येणाऱ्या जाणाऱ्या गाईड्स आणि चालकांना विचारतात  ...त्यांच्या कडून माहिती काढायचा प्रयत्न करतात कि कुठे दिसला का..मग त्या अंदाजाने निघतात.... एखाद्या ठिकाणी १०-१५ मिनिटे वाट बघत थांबतात ....एखाद्या जिप्सीला वाघ दिसला असले तर विचारायची गरज च नसते ...त्यांचे चेहरेच सांगत असतात ....
ह्या चालक किंवा वाटाद्यांनी त्या भागात दिसणाऱ्या वाघांना नावं दिली आहेत त्या वाघांच्या दिसण्यावरून/सवयीवरून किंवा तत्सम प्रकारे आणि ते त्याच भाषेत बोलतात उदाहरणार्थ एका वाघाचा आपापसातील लढाईत कानाचा तुकडा निघालाय तो कनकटा, एक वाघीण सारखी पाण्यात असते तर ती मछली  वगैरे आणि सदहार्ण २ जिप्सी एकमेकांसमोर आल्या की संभाषण साधारण असे , 'दिखा क्या कोई?... नही रे ...बहादूर अभी अंदर गया है किंवा मुन्ना कि दहाड सुनाई दी शायद यही से आयेगा" वगैरे,  ऐकून खूप मज वाटते आपल्या आशा पल्लवित होतात आणि वाटते की जणू हे सर्व ह्यांचे पाळीव पशूच आहेत कि काय
एकंदरीत  २ दिवसाच्या सफारीत वाघ काही दिसला नाही पण नीलगाय, barking दीर वगैरे प्राण्यांनी दर्शन दिले

ह्या काळात पक्षी निरीक्षण मात्र समाधान कारक झाले ....फोटोही  बऱ्यापैकी काढता आले पण वाघोबांनी काही दर्शन दिले नाही....पण वाघ दिसला नाही ह्याचे आमच्यापेक्षा जास्त वाईट त्या रिसोर्ट मधल्या कर्मचारीवर्गालाच झाले असावे ... एकंदरीतच गावातली माणसं फार साधी असतात आणि पाहुणोपचार त्याच्ज्या कडून शिकवा असे माझे मत आहे ....माझ्या पहिल्या सफरीच्या वेळी मी अनुभवले होते आणि आता हि मी अनुभवले ....पहिल्या वेळी सकाळी आम्हास वाघ नाही दिसला तर आमच्या जिप्सीच्या चालकाने दुपारच्या सफरीस स्वतःच्या मुलीस आणले होते कारण ती असली कि वाघ दिसतोच हा त्याचा विश्वास आणि तो त्या वेळीही सार्थ ठरला ...माझ्या ह्या भ्रमंतीच्या वेळी आमचा कर्मचारी वर्ग हळहळलाच पण तिसऱ्या दिवशी आमच्याकडे मोकळा वेळ होता सकाळी कारण आम्ही दुपारी निघणार होतो तर त्यांनी आम्हास संगितले की सकाळच्या वेळेस तरी करून बघा परत एक सफारी करून... बारा एवढाच बोलून ते थांबले नाहीत तरत त्यांनी आम्हास सफारी मिळावी ह्या साठी प्रयत्न पण केले....म्हणजे साधारणतः सफरीच्या बुकिंग महिने - २ महिने आधीच झालेल्या असतात आणि आयत्या वेळी राखीव ५ (ज्या आमदार/खासदार किंवा तत्सम VIP लोकांसाठी राखीव असतात ते जर त्या दिवशी नाही आले तर मग जनसामान्यांसाठी खुले करतात) मध्ये जागा मिळावी म्हणून रात्रभर रांगेत उभे राहून आमच्यासाठी सफारी मिळवली .... पण आमचे नशीब मात्र साथ देण्यास राजी नव्हते ....
पण वाघाचे दर्शन वगळता अनुभव फार छान होता...अप्रतिम फोटो निघाले काही पक्ष्यांची ओळख झाली ...... माणुसकीचे दर्शन झाले आणि एक मात्र कळले की जंगल वर वर कितीही शांत दिसत असले तरी तिथे प्रत्येक क्षणाला काही न काही घडत असते आणि ते टिपण्यासाठी तुम्ही फारच सावध असले पाहिजे ...आणि मुख्य म्हणजे एकाच गोष्टीवर लक्ष न केंद्रित करता आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींचा आस्वाद घेण्यास शिकले पाहिजे....

मगाशी वर उल्लेख केलेल्या देशपांडे विषयी .....रिसोर्ट वर रात्री जेवणानंतर कॅम्प फायर लावत आणि तिथे सर्व गोरी मंडळी (प्रामुख्याने गोरी मंडळीच रिसोर्ट मध्ये होती) मदिरेचे घुटके घेत चर्चा करत बसलेली असत .... आम्हीपण  उब घेण्यासाठी बसायचो तेव्हा ते देशपांडेहि आले आणि चर्चा करता करता सहज विचारले की पुण्याहून थेट मध्य प्रदेशात तेही अशा छोट्या गावी ...तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तराने थोडे              व्हायला झाले ......त्यांच्या म्हणण्याप्रमाणे , बरोबरीचे मित्र खूप च पुढे गेले , मला हि कुटुंबाच्या बाबतीत तडजोड करावी लागते पण कामाच्या बाबतीत मात्र मी खूप समाधानी आहे ....ज्याची आवड आहे त्याच गोष्टीत काम करायला मिळतेय हि खूपच समाधानकारक बाब आहे ...हे वाक्य अजूनही जसेच्या तसे माझ्या लक्षात आहे ... आणि त्या देशपांडेचा हेवा वाटत राहतो

आम्ही अनुभवलेले अरण्य   

Saturday, 24 January 2015

आग्र्याहून सुटका

ना. स. इनामदारांची शहेनशाह वाचत असताना आग्र्याहून सुटका हा प्रसंग आला आणि आग्र्याहून सुटका होवोस्तोवर विचारांना बरेच खाद्य मिळाले.  ऐतिहासिक कादंबरी खुलवण्यात त्यांचा हातखंडा आहेच त्या विषयी काही दुमत नाही.... वाचताना विचारचक्र चालू होण्याचे प्रसंग अनेकदा आले पण त्याची उत्तरे पुढे जाताना मिळत गेली किंवा स्वतःला तर्कसंगती लावता आली पण इथे मात्र कोडं न सुटल्यात जमा आहे... कारण तसा काही दस्तऐवजच नाही किंवा माझ्या वाचनात आला नाही आणि अजून time machine  हा फक्त fantacy चा भाग असल्याने इतिहासात जाऊन शोधून काढू शकत नाही :)

तर महत्वाचा मुद्दा की शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले म्हणजे पेटाऱ्यान्मधून पळाले हे खरोखरच घडले की ही निव्वळ दंतकथा आहे आणि आग्र्याहून सुटका औरंगझेबाने होऊ दिली (अप्रत्यक्षपणे) की मिर्झाराजे जयसिंघ ह्यांच्या मुत्सद्देगिरीचा परिणाम आहे ..... कारण औरंगझेबाच्या कैदेतून पळून जाणे हि वाटते तेव्हढी आणि जितक्या सहज इतिहासाने सांगितली तेव्हढी सोपी गोष्ट नाही.....

औरंगझेब हा बाकी कसा ही असला तरी मुरलेला राजकारणी आणि हल्लीच्या भाषेत सांगायचे तर एकदम shrewed होता हे मान्य करावेच लागेल....त्याशिवाय दारा शुकोह आणि बाकीच्या 2 भावाचा बिमोड करून तख्त वर बसला होता आणि खास करून दारा शुकोहचे दिल्लीवर वर्चस्व असून आणि राजपुतांची साथ असून ही त्याचा त्याने व्यवस्थित बिमोड केला होता ....आणि औरंगझेब किती पाषाणहृदयी होता मी सांगण्याची काही वेगळी गरज नाही .तख्तावर बसण्यासाठी आणि ते राखण्यासाठी तो काही ही करू शकत होता........एवढा सगळं असून ही महाराज त्याच्या हातावर तुरी देऊन सटकले असे म्हणणे म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा होईल कदाचित कारण त्याला जाणीव होती की त्याच्या तख्ताला राहता राहिला धोका फक्त दक्खनच्या बगावतखोर जमीनदार सिवा (म्हणजे शिवाजी महाराज)  कडून आहे आणि ताक ही फुंकून पिणाऱ्या माणसाकडून दुधाचे भांडे सरळ तोंडाला लावले जाईल ह्यावर थोडा विश्वास बसने कठीण होतेय

मुळात शिवाजी महाराज आग्र्याला मिर्झा राजा जयसिंघाने जवाबदारी घेतल्याने औरंझेबाला भेटण्यास आले होते ... औरंझेबानेही त्यास परवानगी दिली ती निव्वळ मिर्झा राजांनी  एवढी मोठी कामगिरी बजावली (जी शाहिस्तेखान आणि औरंझेबाचे इतर मनसबदार ह्यांना  जमले नाही) तर त्यांना कसे दुखावणार आणि त्या निमित्ताने शिवाजी महाराज दक्खन मधून बाहेर पडतील आणि जमल्यास काही दगा फटका करू  हा विचार ....

मग ती दरबारातील ऐतिहासिक घटना घडल्यावर औरंझेबाने राजांना दरबारात येण्यास मनाई केली आणि त्यांना जवळ जवळ नझरकैदेत टाकले ....मग तिथूनच त्यांना काबूलच्या कामगिरीवर पाठवण्याचा त्याचा हेतू होता ....म्हणजे तिथून परत आले नाही आले तरी तिथपर्यंत निर्नायकी परिस्थितीमुळे दक्खन मधल्या मराठ्यांना काबूत आणता येईल....

पण महाराज काही न काही कारण काढून जाणे टाळत राहिले आणि  औरंगझेब  कधी नव्हे ते त्यांचे बहाणे ऐकत राहिला....का???... त्यानंतर ही शिवाजी महाराज मुत्सद्देगिरीचा डाव मांडत राहिले कि मी घाबरलोय आणि मला दक्खन ला जाऊ द्यावे...तिथे राहून मी तुमची चाकरी करेन किंवा माझ्या ताब्यातले अजून गड मी द्यायला तयार आहे पण मला तिथे जाऊन ते हस्तांतरीत  करावे लागतील वगैरे वगैरे पण औरंगझेब हे सगळे ओळखून होता कारण अशाच प्रकारचा काहीसा डाव ते शाहीस्तेखानाबरोबर  खेळले होते आणि त्याला गाफील ठेऊन म हल्ला केला होता....आणि हे न ओळखायला औरंझेब काही शाहिस्तेखान नव्हता.... मग तो राजांच्या वेळखाऊ धोरणाला का बळी पडत होता किंवा तसे का दाखवत होता???

एकंदर पाहता, राजे नझर कैदेत होते म्हणजे मिर्झा राजा जयसिंगचा मुलगा रामसिंग  ह्याचा महालात होते आणी तिथे रामसिंगचा पहार होता आणी राजांची आग्र्यात असतानाची सर्व जवाबदारी रामसिंग ने घेतली होती ..  काही दिवसांनी औरंगझेबाने फुलोद्खानाचाही पहारा बसवला आणी ही संधी साधून महाराजांनी रामसिंगला औरंगझेबकडे शब्द टाकून त्याने घेतलेल्या राजांच्या जवाबदारीतून  मुक्त व्हायला सांगितले  ..... रामसिंगने ही तसा अर्ज केला आणि औरंगझेबाने तो मान्य केला आणि असा अर्ज मान्य करण्यापूर्वी त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली नसेल??... रामसिंगला मुक्त करून तो महाराजांच्या सुटकेची वाटतर मोकळी करत नव्हता?? ...बरं फुलोद्खानाचाही पहारा त्याने का बसवला तर महाराजांच्या जीवाला आग्र्यात त्याच्याच पदरच्या शाहिस्तेखानच्या जवळच्या लोकांकडून धोका आहे हे तो जाणून होता आणि ते संकट त्यांच्यावर येऊ नये म्हणून औरंग्याने ही खबरदारी घेतली होती .........रामसिंग शी संधान साधून महाराज सुटू शकले असते पण फुलोद्खानाच्या पहार्य्तून हि निसटले आणि ते हि पेटाऱ्यातून???

एक वेळ महाराज कैदेतून हुलकावणी देऊन सुटून गेले हे मान्य केले तरी १४००-१५०० किमीच्या प्रवास ही निर्धोक पार पडला ते ही गुजरात पर्यंत मुघली सत्ता असताना??.... त्याचे हेर खाते एकदम जबरदस्त  असताना आणि विशेष असा पहाडी मुलुख नसताना ही ते दरमजल करत दक्खनला पोहोचले???  वेशभूषा बदलून आणि संन्यासी बिन्यासीच्या रुपात ते होते असा म्हटलं तरी असा अंदाज आहे कि त्याच्या हेरांनी संन्यासी , फकीर वगैरे कोणाला ही सोडले नव्हते ....सगळ्यांची झाडाझडती घेतली होती ....तरी ही सुटले????

हे प्रश्न पडण्याच कारण म्हणजे वाचताना जाणवतं की  ना. स. अडून अडून सुचवत आहेत की महाराजांच्या सुटकेमागे अप्रत्यक्षपणे औरंगझेबाचाच हात आहे .... आणि त्याचा वैचारिक सल्लागार नंतर त्याला विचारतो ही की जनतेला वाटतेय शिवाजीला तूच सुटू दिलाय कैदेतून पण औरंगझेब ह्या प्रश्नाच  उत्तर टाळताना दाखवलाय ... कदाचित इतिहासात असे काही पुरावे नसल्याने लेखकाने हा विषय फार नाही वाढवलाय ..... पण .... पण आपल्या डोक्यात मात्र विचारांचा भुंगा भुणभुण करायला  लागला आणि औरंगझेबाने त्यांना जाऊ देण्यामागे काय कारण असू शकेल किंवा माझ्या बुद्धीला काय वाटले ते सांगण्यासाठी म्हणून हा लेखप्रपंच

तर कारण म्हणजे मिर्झा राजा जयसिंघ हे ..... मिर्झा राजा जयसिंघने स्वताच्या जवाबदारी वर महाराजांना आग्र्यास पाठवले होते ....आणि औरंगझेबाच्या दरबारी असणाऱ्या राजपुतांमध्ये जयसिंघचे बर्यापैकी प्रस्थ होते....म्हणजे मिर्झा राजांना नाराज करून बाकीच्या राजपुतांची गैरमर्जी ओढवून घेण्याचा संभाव्य धोका त्याने ओळखला होता...तसेच जर मिर्झाराजांला दिलेला शब्द पाळला  नाही व त्यामुळे मिर्झा राजा रागावला असता आणि त्याने त्यामुळे आदिलशाही आणि कुतुबशाही आणि मराठे ह्यांची मोट बांधण्याचा संभाव्य धोका होता ज्यामुळे हिंदुस्तानभर राजवटीचे स्वप्न लयास गेले असते आणि परत दरबारातले इतर राजपूत ही मिर्झा राजास जाऊन मिळू शकले असते आणि हातचा राजपुताना ही जाऊ शकला असता....  तसेच हिंदुस्थानभर सत्ता स्थापन करण्याचे त्याचे स्वप्न धुळीस मिळू शकले असते

आणि ह्या तर्कास पुष्टी मिळते म्हणजे शिवाजी राजांसारख्या शत्रूस (ज्यांच्य्मुळे औरंगझेबास दिल्लीच्याही तख्तास धोका वाटत होता) जेरबंद करून पाठवल्याबद्दल आणि २३ किल्ले जिंकल्यानंतर (जे त्याच्या नामांकित मनसबदारानाहॆ जमले नाही) वास्तविक मिर्झा राजांना त्याने कुठे ठेऊ न कुठे नको असे म्हणत डोक्यावर घेऊन नाचावयास हवे होते पण तसे न होता त्याने त्यांना बाजूला करत काबुलच्या मोहिमेवर पाठवले आणि बुऱ्हाणपूरच्या छावणीत विषप्रयोग करून काटाकाढला म्हणजे कोणालाच काही संशय नको.... आणि परत रामसिंघास हि मामुली सजा देऊन मोकळे केले ...वास्तविक त्याचा स्वभाव पाहता रामसिंघास त्याने जिवंतच सोडावयास नको होते ....

हेच जर शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटी च्या वेळेस मिर्झा राजा ही आग्र्यास उपस्थित असता तर कदाचित शिवाजी महाराज सुटणे कठीण होते कारण मिर्झा राजा त्याच्या टप्प्यात असले असते आणि त्यांना काबूत ठेवणे त्यास शक्य झाले असते ....

आपल्यास इतिहासाच्या पाठ्य पुस्तक  आणि तत्सम साहित्य किंवा मालिका, चित्रपट ह्यांनी आग्र्याहून सुटका पेटाऱ्यातूनच झाली हे असे बिम्बवलेय की आपण बाकी कसल्या गोष्टींचा म्हणजे शक्यता-अशक्यता , धोके वगैरे गोष्टींचा दुरान्वये ही विचार करत नाही ....हा लेख वाचून तुमच्या मनात विचारांचा भुंगा भुण भुण करायला लागला असल्यास ते माझ्या लेखाचे यश च म्हणावे लागेल :)

विशेष सूचना :- हा लेख पुढे कोणास पाठवू नये कारण हा कोन जहाल आणि संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यान्सारख्या विचारवंत व्यक्तीच्या वाचनास आला आणि त्यास माझे विचार न पटल्यास ते माझ्या घराचे नुकसान करू शकतील :)

आणि हो

शिवाजी महाराज हे माझे दैवतच आहेत आणि त्यांना ह्या लेखातून त्यांचे थोरपण कमी करण्याचा अजिबात प्रयत्न नसून फक्त माझ्या सध्या रिकाम्या डोक्यात आलेले विचार कागदावर उतरवण्याचा आणि जमल्यास सम विचारी लोकांमध्ये चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न आहे ....




Thursday, 11 December 2014

एका समुद्रापार

बऱ्याच दिवसात काही लिहिलं नव्हतं  आणि लिहिण्याची खुमखुमी काही स्वस्थ बसून देत नव्हती......इतक्यात भटकंती पण नव्हती झाली मग काय लिहा तर आपलं ओमानच्या स्थलांतराविषयी लिहू असं वाटलं  आणि लिहायला सुरवात केली ..... फार काही लिहिता येईल असं नव्हतं वाटला पण तरी बरच झालय बहुदा :) .... ओमान आणि आपल्यामध्ये (म्हणजे भारत) फक्त अरबी समुद्रच असल्याने एका समुद्रापार हे शीर्षक दिलंय.... 
तर ३1 ऑक्टोबरला माझं प्रस्थान होतं...हा हा म्हणता माझ्या प्रस्थानाचा दिवस उजाडला.....वाटलं होतं तेवढं हळूवार मन काही झालं नाही कारण शेवटच्या क्षणापर्यंत सामानाची बांधाबांध चालू  होती......विमान कंपनीने दिलेल्या मर्यादेत सामान बसवणे किती कठीण असतं याची तेव्हा कल्पना आली....कारण सगऴंच महत्वाचं वाटतं.....प्रायोरीटी ठरवता नाही आली की असं होतं न बहुतेकांच असं होत असावं ..... आणी माझी बायको म्हणते त्या शॅबी का काय शब्दाला ही जागायचे होतेच ना...... असो ...फोन तर थांबत नव्हते आणि त्या मुळे कामात व्यत्यय येत होता पण सदिच्छांचा अव्हेर करून कसे चालणार..... शेवटी कसंबसं मनासारखे आणि विमान कंपनीच्या मर्यादेत समान बसवलं...ह्यात माझा वाटा फक्त सामान उचलून वजन करण्यापुरताच बाकी सगळी करमत आमच्या सौंची :) ... हे सगळं होईस्तोवर काहीतरी खावून बाहेर पडायची वेळ झाली होती ..... माझ्यासाठी खास केलेल्या  बटाट्याची भाजी आणी पोळी चे घास कसेबसे खाल्ले (कारण बैचेनी फार वाढत होती..... साहजिकच  होतं म्हणा ..... एक सिक्युअर लाइफ सोडून अज्ञाताकडे चाललो होतो..... कितीही आत्मविश्वास असला तरी)
सगळेच येणार होते एअरपोर्टवर सोडायला..... म्हणून मोठी गाडी केली होती...... गाडीत बाकीच्यांच्या गप्पात सामील व्हायला तसदी घ्यावी लागत होती..... मधेच  आई आणि सासूबाईनी मिळून टोमणा मारलाच की सगळं सुरळीत चालू असताना काय हे मध्येच वगैरे पण मी ऐकून न ऐकल्यासारखं 
केलं     ........ त्यांचं ही बरोबर आहे म्हणा.....आपली माणसं आपल्या बरोबर असावीत असं वाटलं तर त्यात वावगं ते काय???
           एअरपोर्टवर  माझी बहिण,  तिचे सासरे  आणि माझी भाची तनूडी (तन्वी) आले होते...... बाहेर कोणी जात असले की येवढा लवाजमा लागतोच..... जाणारा एकटाच किंवा फार तर दोघे पण  सोडायला गाव ...... त्यामुळे थोडं इमोशनल व्हायला होतं पण ठीक आहे ...... जसं आत जायला निघालो तसा आईचा बांध फुटला.... माझा ही म बांध फुटायच्या बेतात होता पण कसंबसं सावरलं......माझा बोर्डींग पास मिळून लगेज चेक इन करेपर्यंत सगळ्यांना थांबायला सांगितले होते कारण सामान जास्त झालं तर जास्तीचं सामान काढून परत पाठवायला... पण आमच्या सौ आणि आमच्या आठवडाभराच्या मेहनतीला फळ आले होते.... एकदम परफेक्ट वजन झालं सामानाचं...... बाकी मग सिक्युरिटी चेक आणि इमिग्रेशन फटाफट पार पडले...... दुपारचे फ्लाइट असल्याने काहीच गर्दी नव्हती ...... हे सोपस्कार आटपल्यावर मग भुकेची जाणीव झाली .. पिझ्झा हट चा पिझ्झा खाऊ म्हटलं.... भरपेट खाण्यात अर्थ नव्हता (अर्थ नव्हता असं नाही .... कमीत कमी अर्थात (अर्थातच) भागवायच होतं :) )  अस विमानात मिळणार च होतं आणि तेवढाच खिशाला चाट कमी ....


मग पिझ्झा हाण्ल्यावर T2  वारी करत होतो तेवढ्यात एका ओळखीतल्याचा  फोन आला.... माझ्या बहिणीच्या ओळखीतला आहे तो अन माझ्याच flight  ने ओमानला येणार होता....म्हणजे तो बराच काळ deputation वर इथे होता....त्याच्याशी बोर्डिंग गेट वर भेट अन ओळखीचा कार्यक्रम झाला आणि flight रिकामे असल्याने आम्ही शेजारीच बसलो ... तो ओमान विषयी सांगत होता आणि मला  जेवढे जमेल तेवढे जाणून घ्यायचे होते.... तशी बऱ्यापैकी माहिती मी काढलेली होती पण त्याने प्रत्यक्षात काही काळ व्यतीत केला असल्याने त्याचे ऐकणे जास्ती महत्वाचे होते.... विमानातील 'खानपान' (म्हणजे खान (खाणं) च फक्त) आस्वाद घेतल्यावर मला झोप येत होती पण अजून त्याचे सांगणे संपलेले नव्हते सो जांभया देत ऐकत होतो .... मध्ये त्याने service विषयी तक्रारीचे पत्र लिहायला घेतल्यावर झोपायचा प्रयत्न केला पण ते शक्य नाही झाले :) ... ३ तासांनी ओमानच्या भूमीवर आमचे विमान उतरल्यावर मला त्याची जास्ती मदत होणार होती immigration  आणि विसा stamping करून घ्यायला...ह्या गोष्टी फार नवीन नाहीत पण तरी हि कोणाची मदत होत असेल तर हवीहवीशी वाटतेच.....

आम्ही उतरल्यावर विसा फी भरल्याची पावती भरून विसा घ्यायचा होता आणि त्या खिडकीवर गेल्यावर हा कोणाला तरी हाक मारत धावत पुढे गेला... म्हटलं काय झालं ह्याला???.... मग ground staff  च्या वेशात असलेली एक अरेबिअन स्त्री समोर आली .... तिच्याशी त्याची बरीच चांगली ओळख होती आणि त्यामुळे त्याचा न त्या कृपेने माझं हि काम पटकन झालं... मग ह्याला त्या बाईला लग्नाचं आमंत्रण द्यायचं होतं.... मला अजून एक धक्का ... कारण ह्याचं लोकेशन मस्कत पासून सलाला म्हणून ११ तासावर (किंवा दुसर्या विमानानं जावा लागणाऱ्या ठिकाणी) होतं आणि म्हटलं जर मस्कत विमानतळावरून  बाहेरच नाही पडावा लागत तर ओळख कशी काय.... अजून तर धक्के पुढेच बसायचे होते..... त्याने मग त्या बाईला सांगितल,  मला लग्नाचं आमंत्रण द्यायचंय तुला (त्याचं लग्न होतं नोव्हेंबर मध्ये)... मग ती बाहेर आली आणि मग तिच्या पाया पडून तिला आमंत्रण दिलं आणि मग माझ्याशी ओळख करून दिली  ... मग कळलं त्याच्या पहिल्या visit  च्या वेळी त्याला काही प्रोब्लेम झाला होतं आणि तिने त्याला मदत केली होती आणि मग ओळख वाढून वाढून मैत्री झाली (मैत्रीला जात पात, वय , सत्र-पुरुष अशी काही बंधन नसतात - इति अगणित साहित्यिक आणि विचारवंत)... आणि जेव्हा तिच्या डोळ्यावर भारतात (हो इथले लोक medical treatment साठी भारतात येतात) शस्त्रक्रिया करायची होती तेव्हा ती ह्याच्याच घरी उतरली होती...  एकंदरीत जाणवलं आणि छान  वाटलं कि इथल्या लोकांच्या मनात हिंदूंविषयी अढी नाहीये आणि पुढे पण लोकांकडून कळत गेलं की हे लोक भारतीयांना मानतात

 मग सगळे सोपस्कार पार पडल्यावर बाहेर आलो तर माझे मित्र बाहेर वाट पाहत होते ...कंपनीचा माणूस अजून काही आला नव्हता पिकअपला...रूम म्हणजे guest house  ची चावी त्याच्याकडेच होती सो त्याची वाट  पाहणं गरजेच होतं .... तेवढ्या वेळात सीम कार्ड वगैरे घेतलं आणि तो माणूस आल्यावर आम्ही माझ्या रूम वर समान टाकलं आणि मित्राच्या (सायमन) घरी जेवणाच आमंत्रण होतं तिथे गेलो ..... जेवायला  जरा वेळ होता सो त्याने मला तिथल्या तिथे फिरवून आणलं... घरी आलो तर जेवायला पुरणपोळीचा बेत होता ... स्वप्नातही वाटलं नव्हतं की वाळवंटात पहिल्याच दिवशी मला पुरणपोळी मिळेल :)

सायमनने त्याच्या आईला ओमान फिरवायला आणल  होतं आणि दुसऱ्या दिवशी त्या भारतात परतणार होत्या .... म्हणून मिलिटरी मध्ये म्हणता तसा "बडा खाना" होतं....त्या जाणार म्हणून रात्री बिल्डिंग मधले अजून काही लोकं (आपटे आणि देशपांडे) कुटुंबीय त्यांना भेटायला आले (हे हि अप्रूपच की केरळी लोक भेटण्याआधी चक्क आपटे आणि देशपांडे भेटले).... ते पण  आधी जेकब्स मधेच होते म्हणून ओळखीचे होते... मग गप्पा वगैरे झाल्यावर सायमनने guest  house  वर सोडले ...

दुसऱ्या दिवशी सकाळी ११ ला उठलो ..... मस्त निवांत झोप लागली .....उठल्यावर चहाची सवय...माझ्याकडे चाह्चे काही सामान नव्हते आणि म त्यामुळे पुढच्या हालचालींना काही वेग येईना.. आणि हॉटेल हि माहित नव्हते .... मग शेजारीच एक पुनीत जैन माझ्यासारखाच नवीन joinee (पण त्याला २ आठवडे झाले होते) त्याने मला कॉफ्फी चे सामान दिलं आणि माझ्या दिवसाला सुरवात झाली.... dupari jevaycha काय करायचा हा प्रश्नच होता ... घरून आणलेले पराठे आणि सफरचंद खावून भगवा भगवी करावी का असं वाटत होता....म्हटलं संध्याकाळी हॉटेल बीटेल शोधू.... आणि परत सायमन धावून आला.... तो म्हणाला मी तुला घ्यायला येतो माझ्याकडेच जेवायला चाल....आणि दुपारच्याही जेवायची सोय झाली... मग तिथून आम्ही सुपर मार्केट मध्ये गेलो आणि जीवनावश्यक वस्तू म्हणजे चहा, साखर, मीठ , म्यागी, ब्रेड, दूध, पाणी , फळं, juices आणि लबान(ताकाला इथे लबान म्हणतात) घेऊन आलो .....साधारण आठवडाभराची तरतूद केली आणि मला रूम वर सोडून गेले.....


एकंदरीत परदेशात गेल्यावर कसे काय होणार ही  जी नाही म्हटले तरी धास्ती होती ती सायमनच्या मदतीमुळे बरीचशी निवळली .... आता मी बराचसा रुळलो आहे आणि आता माझ्या सौंना आणायच्या खटपटीत आहे....खाण्यापिण्याचे काही ही हाल झाले नाहीत आणि आफिसात बरयापैकी रेस्पोन्सीबिलीटी दिलीय...  फक्त अजून फार से फिरणे झाले नाहीये ....पण फिरेनच आणि पुढच्या ब्लोग ची लिंक आली की तुम्हालाही कळेल की आलाय भटक्या कुठेतरी भटकून..... तसे हि ते गाणे आहेच ना काहीतरी "फिरुनी नवी जन्मेन मी" ...तसे फिरुनी नवीन ब्लोग लिहीन मी :)

اشوفك تاني
Ashofak tany
(पुन्हा भेटूच)

Tuesday, 2 September 2014

सज्जनगड - 2

ll जय जय रघुवीर समर्थ ll

सज्जनगड २ म्हण्यापेक्षा सज्जनगड ४ जास्ती योग्य वाटले असते पण bagpackers बरोबर मी दुसऱ्यांदा सज्जनगड वर जात होतो म्हणून सज्जनगड २ हेच शीर्षक जास्ती समर्पक वाटले......हो सज्जनगडावर मी चवथ्यांदा जात होतो...कारण विचाराल तर प्रत्येकाची काही श्रद्धा स्थानं असतात आणि त्या ठिकाणी माणूस वेळात वेळ काढून वर्षातून एकदा का होईना जात असतो आणि सज्जनगडावरून दिसणारा निसर्ग (खास करून श्रावणात), तेथील प्रसन्न वातावरण हे माझ्या मते त्यावर श्रद्धा ठेवण्यास पुरेसे आहे. आणि कमी वाटल्यास बलोपासना आणि स्वयंशिस्तीचा पाठ देणारे तसेच साक्षात शिवाजी महाराजांचे गुरु/मार्गदर्शक रामदास स्वामी आहेतच..... तर सज्जनगड करायचा आणि सह्यपठार  आणि कोंकण ह्यांना जोडणाऱ्या असंख्य घाटांपैकी एका घाटातून खाली उतरायचे असा आमचा उपक्रम... ह्या घाटांचे पावसाळ्यातील सौंदर्य अगदी खास जाऊन अनुभवावे असे असते .......

ह्या वेळी फारसा विचार करायला वावच नव्हता अमेयला malaysia ला जावे लागले आणि मी  काम आणि काही घरगुती अडचणीत अडकलो होतो तरीही आम्ही ८ ऑगस्ट हि तारीख ठरवली... ह्या वेळी bagpackers मध्ये सुर्वे, डेडली झोपे आणि पाटील हे तीन नवे मेम्बर add झाले (तसे तर साधारण १४-१५ जन येणार होते पण ऐन वेळेची गळती...त्याला काही इलाज नाही) आणि धुरा हाती घेऊन फार आधीपासून दौऱ्याची सुनियोजित आखणी करायला लागले (म्हणजे tempo  traveller  ची चौकशी, खाण्या-राहण्या ची सोय वगैरे वगैरे) bagpackers चे founder  members  (म्हणजे अमेय आणि मी) अचंबित होऊन हा प्रकार पाहत होतो कारण आम्ही कधीच आधीपासून काही न ठरवता ठरल्या दिवशी bags  घेऊन मोकाट सुटतो .... पण आकस्मिक गळती मुळे ह्या सर्व गोष्टीच्या त्यांच्या उत्साहावर विरजण पडले आणि  bagpackers च्या परंपरेला अनुसरून अमेय आणि आम्हीच काय ती थोडीफार रूपरेषा आखली... मी हो तर म्हणालो होतो पण मनाची तयारी होत नव्हती कारण घरी प्रोब्लेम होते आणि विचारलं ही नव्हतं पण अमेय ने "समर्थाचिया सेवका वक्र पाहे! असा भूमंडळी कोण आहे!!" असं सांगून हुरूप वाढवला आणि हो नाही करता करता निघायची तयारी झाली 

Bagpackers
ऐनवेळी आमचा भरवशाचा सदस्य प्रशांत बेंद्रे (ज्याच्या सहनशिलते विषयी  मागच्याच लेखात माहिती दिली गेलीय) आकस्मिक कारणामुळे गळला आणि सावत्या दुसऱ्या दिवशी येउन आम्हाला join होणार होता (bag packers  बरोबर येण्यासाठी सावत्याने त्याच्या department च्या पिकनिकलाही टांग दिली त्याबद्दल त्याचे आभार आणि त्या ग्रुप कडून त्याला शिव्या खाव्या लागू नयेत म्हणून आम्ही त्याचे येणे गौप्य ठेवले) ....शेवटी आम्ही ७ जणांनी (आणि शनिवारपासून पुढे  सावत्या असे ८ जण) आमच्या श्रद्धास्थानाकडे प्रस्थान केले ....शुक्रवारी रात्री टोनी दा धाबा वर जेवण हाणून मग निगडी ला अमेयकडे राहायचे ....दुसऱ्या दिवशी पांचगणी आणि अम्बेनळी घाट उतरून परत चढायचा आणि सज्जनगडावर मुक्काम आणि रविवारी सकाळी लवकर निघून दुपारपर्यंत रक्षाबंधनाला घरी असा सुटसुटीत प्रोग्राम ठरला ....

   ठरल्याप्रमाणे टोनी दा धाबाला थांबलो आणि u mumba चा  कबड्डीचा सामना पाहत पहिले रबडी - जिलेबी ची ओर्डर दिली आणि सुरवातच dessert पासून केली मग गुलाबजाम काय पनीर अंगारा काय आणि नोन-वेज वाल्यांची त्यांची सामिष भोजनाची ओर्डर काय ....खाण्याला काही सुमारच उरला नव्हता (तरी ह्या वेळी फ्रुट-पंच घेतला नाही)  .. आणि कदाचित आमची खा-खा पाहून u mumba चे खेळाडू ही सुस्तावले आणि जिंकणारा सामना बरोबरीत सोडवून बसले....टोनी दा धाबा कडून आम्ही अमेय च्या घरी आलो आणि आवराअवर करून पत्त्यांचा डाव रंगवला..........३ पत्ती खेळायचे ठरले आणि झोपे गुरुजींनी पुराणीकाला दीक्षा दिली आणि जुगाराचा डाव उत्तरोत्तर रंगत गेला...पहिलाच डाव मारणाऱ्या झोपे गुरुजीना नंतर काही नशिबाने साथ दिली नाही आणि सुरवातीला साथ न देणाऱ्या नशिबाने पुराणिकची साथ भैरवीपर्यंत काही सोडली नाही ....

कॉलेज नंतर बऱ्याच वर्षांनी रात्री जागून पत्त्यांचा डाव रंगवला होता आणि मजा पण  खूप येत होती पण सकाळी लवकर (??) निघायचे असल्याने रात्री २ ला आटोपते घेतले आणि शेवटचा डाव २ ला मांडला आणि अगदी फिल्म्स मध्ये दाखवतात तसे शेवटचा डाव कातील रंगला गुरु आणि शिष्या मध्ये.... पण शिष्याचा अनुभव कमी पडल्याने त्याला गुरुला रिकामे करता आले नाही .... झोपताना अजित  आणि स्वप्नील मध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगलेली आणि मजा ही येत होती कारण शुद्ध बाळ्बोधपणा आणि चतुरस्त्र उपमा अलंकार ह्यांच्यातला सामना काही औरच असतो :) ...कोणीतरी म्हणाले की ही  जुगलबंदी अजून बरीच रंगली आणि इतरांची हसून हसून पुरेवाट झाली  पण माझ्याच्याने आता काही जागरण होत नाही सो मला काही कळलेच नाही .....

समर्थांच्या दर्शनासाठी चाललेलो आम्ही त्यांनी घालून दिलेला स्वयंशिस्तीचा पाठ किती काटेकोरपणे पाळत होतो नाही ... एकदम मोजून मापून खाणे... वेळेत झोपणे - वेळेत उठणे  आणि सदाचार :)

सकाळी ३-४ जन सावत्याला आणायला चिंचवडला गेले आणि तिथपर्यंत आमच्यासारखे सूर्यवंशी तयारी करत होतो ...सावत्याच्या आगमने उत्सवी वातावरण पार शिगेला पोहोचले ....ठरल्याप्रमाणे वेळेतच प्रवासाला सुरवात झाली ... कात्रजचा टोल क्रॉस करून पुढे नाश्ता करावयास थांबलो आणि भरपेट मिसळ, साबुदाणा खिचडी, डोसा वर चहा, कॉफी हादडून घेतले आणि पुढे आंबेनळी घाटाकडे प्रस्थान केले .... खंबाटकी घाट, पसरणीचा घाट , वाई पार करत आम्ही पांचगणी जवळच्या भिलार धबधब्या जवळ आलो .... फार च अप्रतिम साईट आहे भिलारचा धबधबा .... फार उंचावरून म्हणजे साधारण ४५०० फूट उंचीवरून कोसळतो आणि निसर्गाचे तो मुक्त अविष्कार आपण साधारण त्याच उंचीवरून पलीकडच्या पठार  म्हणा रोड म्हणा किंवा टेकडी म्हणा तिथून अनुभवत असतो.....आणि पावसाळ्यात तर तो अगदी आवेगाने कोसळत होता ....आम्ही तिथे शिरस्त्याप्रमाणे फोटो काढले आणि पुढे मोराच्या केकावलीचा आवाज आल्याने कुठे मोर दिसतोय का पाहण्यास उतरलो आवाजाच्या दिशेने ....आमची चाहूल लागताच तो पुढे उडायचा आणि परत लांडोरीना सावध करायचा पण दिसत मात्र नव्हता..... आणि अचानक तो समोरून उडत पुढे खाली दरीत उतरला....अहाहा! काय अप्रतिम नजर होता ... आपल्या असाधारण अश्या पंखाचा पिसारा फुलवून उडणारा मोर पाहण्यासाठी भाग्यच असावे लागते बहुदा कारण अजून पर्यंत २-३ अभयारण्यात शेकडोंनी मोर पाहिले पण उडणारा मोर कधीच पहिला नव्हता .... तो क्षण मी कॅमेऱ्यात उतरवू नाही शकलो पण माझ्या स्मृतीत तो कायमचा कैद झालाय .... आणि जसे अजून जवळ गेलो बाकीच्या लांडोरही ४-५ असाव्यात मागोमाग उडत दरीत उतरल्या.... सावत्या महाराजांनी मोराचा आवाज काढत त्याला साद द्यायचा प्रयत्न केला पण निष्फळ ठरला... पहिल्यांदीच असे झाले असेल की आमच्या सावत्या महाराजांनी साद घातली आणि पक्षी-प्राणी त्यांच्या जवळ घुटमळले नाहीत  ....असो ... परत फोटोग्राफी केली आणि चहापान करून आम्ही माप्रो गार्डन कडे जावयास निघालो....माप्रो गार्डन मध्ये फक्त strawberry icecream खायचा प्लान होता पण जेवणाची वेळ झालीच होती आणि wooden  smoked pizza  आणि grilled  sandwitches पाहून आम्हास राहवले नाही गेले आणि पिझ्झा आणि sandwitch ओर्डर केले आणि एवढं सगळं झाल्यावर hot sizzling chocolate brownie must होतं....मग सगळ्यांनी घरच्यासाठी माप्रोमध्ये मनसोक्त शोप्पिंग केलं आणि आम्ही माप्रो गार्डनची धावती भेटही ....तिथले breads आणि पिझ्झा बेसेस hand made होते आणि म्हणूनच कदाचित फारच सुंदर लागत होते ...पांचगणीच्या वातावरणात सगळेच हरखून गेले ....धुंद ढगाळ पावसाळी असे रोमांटीक होते की सगळ्यांना जाणवून गेले की family picnic ही इथेच झाली पाहिजे .....मी पुढाकार घेऊन ऑक्टोबर मध्ये काढूया असे ठरवेल पण हे सगळे प्लान हवेतच विरतात हे माहितेय मला....






पांचगणीत माप्रो गार्डन मधेच येवढा उशीर झाला होता की आम्हाला अंबेनळी घाट उतरून पुन्हा येउन सज्जनगडावर जायला फारच उशीर झाला असता आणि कदाचित गडाचे दरवाजे बंद झाले असते .... आमच्यातल्या सामिष भोजन घेणार्यांचे जेवण आणि अजून व्हयाचे होते त्यांच्यासाठी सामिष जेवण मिळणाऱ्या धाब्याच्या शोधात पांचगणीकडे मोर्चा फिरवला ..... पांचगणीचे मला एकदम नॉर्थ कडल्या हिल स्टेशनशी साधर्म्य जाणवले आणि लोकांकडून ऐकलेले की बोर जागा आहे वगैरे  सगळे झूठ आहे असे वाटून गेले.... पांचगणी मला प्रथम दर्शनी तरी आवडून गेले आणि परत एकदा इथे यायचे असे मनोमन ठरवले ....













                                                            माप्रो गार्डन

 आमच्या non-veg खाणाऱ्या मित्रांनी धाबा शोधलाच आणि मनसोक्त चिकन हादडले ....आता आम्ही गडाकडे जाण्यास निघालो आणि वाटेत पारसी point ला थांबून खालच्या दरीचे मनसोक्त दर्शन घेतले आणि फोटोसेशन ही :) .... तिथे ईश्वर , बेटा, तारे झमीन पर, राजा हिंदुस्तानी आणि चेन्नई express चे शूट झालेले स्पोट बघायला मिळाले दुर्बिणी लावणाऱ्यान्कडून   :) ....सुर्वेनी त्यांच्या बालपणात सुलभ प्रवेश करून balling ची भारतीय आवृत्ती खेळून घेतली ... मग येतानाच मी harrison folley पाहून ठेवलेली आणि सगळ्यांना जायचा आग्रह केला....सुरवातीला फार कोणी तयार नव्हतं कारण  गडावर लवकर पोहोचायचं होता पणमी हट्ट धरून ठेवला न तिथे गेलो आणी नंतर तिथून  कोणाचा हि पाय च निघेना.... तुफान point आहे harrison folley ...स्वप्नीलच्या गाडीचा त्या पठारावर वारू उधळला आणि ८ च्या आकड्यात गाडी चालवायला लागला.... तिथेच विंचू, पैसा असे सरपटणारे प्राणी दिसल्यावर आमच्यातले steve irwin जागे झाले आणि त्या विंचवाचे एवढे फोटो काढले की त्याला रातोरात सुपरस्टार झाल्यासारखे वाटले असावे ..... वेळेच्या कमतरते अभावी आम्हास पाय काढता घ्यावा लागला नाहीतर तंबू ठोकून मुक्काम करावा अशी जागा आहे ती ....







 Harrison Folley & Parsi Point


मग मजल दरमजल करीत आम्ही एकदाचे सज्जनगडावर पोहोचलो.....चहापान केले आणि धर्माशालेतल्या खोल्यांचा ताबा घेतला .....सगळेच थकलेले असल्याने आरतीची आणि दासबोध पठणाची वेळ होवोस्तोवर सगळ्यांनी पाठ टेकवली .... पाटलाची जर थट्टा मस्करी चालू होती पण सज्जनगड  दातारांच्या विशेष श्रद्धेचा भाग असल्याने त्यांनी पाटलास  थोडे दमात घेऊन स्वतावर कंट्रोल ठेवण्यास सांगितले .... उगाच आपल्यामुळे गोंधळ उडून शांततेचा भंग नको व्हायला .... सुरवातीला म्हटल्याप्रमाणे सज्जनगड आहेच अप्रतिम आणि तेथील अध्यात्मिक वातावरणात तुमच्या मनास १ वेगळीच प्रसन्नता लाभते जी शब्दात नाही वर्णन करता येत!!!!
सज्जनगड महादरवाजा
....

मग आम्ही आरती चालू असताना उतरलो ...समर्थांच्या समाधीचे दर्शन घेतले .....आणि प्रसादाचे जेवण जेवावयास आलो .... प्रसादाचे भोजन म्हणजे आमटी, भात आणि ताक ... पण त्याची चव काय वर्णावी ..... सज्जनगडावर येण्याचे हे ही एक कारण की तिथल्या अप्रतिम प्रसादाच्या जेवणाचा आस्वाद घ्याता यावा,.... एकदम सरळ , साधे आणि सात्विक ...छानच ....साधारणतः ते खूप आग्रह करतात पण ह्या वेळी घळीतून (शिवथरघळीतून) १ कुटुंब अचानक आणि उशिरा आले आणि त्यांच्या जेवणाचेही बघणे क्रमप्राप्त होते म्हणून त्यांनी फार आग्रह नाही केला तरी ही व्यवस्थित झाले...जेवण वाढत असताना रामनामाचे स्मरण केले जाते ते तर ऐकावयास खूप सुंदर वाटते ... खूपच तालासुरात आणि एवढे छान ऐकल्यावर जेवण का नाही गोड लागणार हो ....

समर्थांच्या मंदिरात खाली त्यांची समाधी ही आहे आणि मंदिराच्या बाजूस समर्थांच्या रोजच्या वापरात असलेल्या काही गोष्टी जतन केल्या आहेत  ज्यात त्यांची पाणी पिण्याची भांडी, त्यांना शिवरायांनी दिलेला पलंग, त्यांची शस्त्र अशा गोष्टींचा समावेश आहे ... इतर धार्मिक विधींबरोबर त्यांच्या समाधीस दररोज अभिषेक केला जातो ... त्या मंदिरात समर्थांची माहिती ....तसेच त्यांचे शिष्य कल्याणस्वामी आणि इतर काही शिष्यांची तसेच गडावरील महत्वाच्या प्रसंगाची छान  माहिती दिली आहे ... दुर्दैवाने आता दोन गट पडले असून दोन वेगवेगळ्या संस्था तिथे कार्यरत आहेत आणि त्यांच्यात समर्थांवरील हक्कासाठी भांडणं चालू आहेत .... समाधानाची बाब एवढीच की दोन्ही संस्था भक्तांना व्यवस्थित वागणूक देतात आणि त्यांची गैरसोय नाही होऊन देत  ,,, असो ....समर्थांच्या वापरातील वस्तू पाहूनच कळून चुकते की माणूस किती दणकट आणि कणखर असावा आणि बलोपासना त्यांनी नुसतीच सांगितली नाही तर स्वतः ही आचरणात आणलीय... बोले तैसा चाले म्हणूनच त्यांची वंदावी पाऊले.....

जेवण झाल्यावर आम्ही गडाच्या एका टोकास असलेल्या धाब्याच्या मारुतीच्या मंदिराकडे गेलो आणि मनोभावे मारुतीस्तोत्र म्हटले आणि थोडा वेळ गप्पा मारल्या .... धाब्याच्या मारुतीची स्थापना स्वतः समर्थांनी गडाच्या रक्षणासाठी केली आहे... हे गडाच्या टोकाला असल्याने फार निवांत जागा आहे .... मला विचारलं तर गडावरची माझी सगळ्यात आवडती जागा...आता रिमझिम पावसास सुरवात झाल्याने आम्हास हलणे क्रमप्राप्त होते ... आता खोली वर येउन पहुडलो आणि पटकन निद्रादेवीच्या स्वाधीन झालो कारण बऱ्याच जणांना काकड आरतीस जायचे होते ....
धाब्यावरचा  मारुती

सकाळी लवकर उठण्याशी माझं फारच सख्य असल्याने मी काकड आरतीस जाणं शक्यच नव्हतं.... सकाळी जाग आली तेव्हा पुराणिक काकड आरतीस जाऊन आला होता आणि त्याची चाहूल लागल्याने आमची झोप चाळवली गेली  आणि अमेय नाराज झाला होता कारण त्याला फार जायची इच्छा होती नि त्याला कोणीच उठवलं नव्हतं... सावत्या आणि डेडली दोघे ही गायब होते आणि नंतर कळलं की ते धाब्याच्या मारुतीवर जाऊन आले आणि तिथे भीमाशंकरच्या धुक्याचा आस्वाद घेतला तसेच गाणाऱ्या पक्ष्याचे गाणे ऐकले आणि प्रसन्नतेचl आस्वाद घेतला ज्यास आम्ही मुकलो ....




साधारण ७.३० पर्यंत आम्ही सगळे  तयार झालो आणि खाली चहा पिण्यास उतरलो ..... मग तिथेच नाश्ता करायचे ठरले .... मिसळ, उपमा आणि पोह्यांचा भरपेट नष्ट करून आम्ही परत धाब्यावरच्या मारुतीस जायला निघालो .... वर म्हटल्याप्रमाणे ती माझी आवडती जागा आहे आणि जे पहिल्यांदी आले होते त्यांना सकाळचे धाब्याच्या मारुतीवरून दिसणारे सौंदर्य दाखवायचे होते ... ..म्हटलं एकदा आलोय तर मन भरल्याशिवाय परत नाही जायचं.... तसे ही माझ्यासाठी बरीच emotional trip होती (कारण नंतर कळेलच किंवा ब्लोग पब्लिश होईस्तोवर कळलंच असेल)....पूर्वी धाब्यावरचा मारुती हे छोटेखानी जीर्ण झालेलं कौलारू मंदीर होतं... आता त्याला व्याय्व्स्थित बांधून, रंग रंगोटी करून जीर्णोद्धार करण्यात आलाय आणि डोंगराच्या कडेने चालताना समोरच  असलेल मंदीर अफलातूनच भासतं ... त्या landscaping च्या कोणी प्रेमात न पडलं तरच नवल ... तसेच त्या मंदिराच्या दोन बाजूस खोल दरी आणि एका बाजूस सुंदरसं धरण ....adbhutनजारा आणि दूरवर दिसणारा ठोसेघरचा धबधबा आणि ढगांचे म्हणजेच उन - सावलीचे खेळ  ....... एखाद्या कवीला ही हे वर्णायला शब्द सापडणार नाहीत ... तसच खाली पायाशी असणाऱ्या गावातले दिसणारे हिरव्यागार अशा  शेतांच्या मधोमध असणारे रंगरंगोटी केलेले मंदिर...मधूनच काळ्याभोर सडकेवरून  जाणारी लाल s.t.  ....हा सर्व कॅनवास काय वर्णावा ....आहाहा ....निसर्गाने रंगांची मुक्त उधळण केलीय असे वाटून जाणारा नजारा ..... मधूनच पक्ष्यांचा किलबिल... वेळ कसा निघून जातो कळतच नाही .... पण आता बहिणी घरी वाट पाहत असल्याने निघणे गरजेचे होते .... म समर्थांच्या समाधीचे, धाब्याचा मारुती न पेठेतला मारुती ह्या सर्वांचे दर्शन घेत आम्ही धर्माशालेतल्या आमच्या खोलीकडे परत आलो ....आमचे समान घेतले आणि परतीच्या प्रवासास सुरवात केली.....




दत्तगुरू (उर्फ सावत्या महाराज)


 सज्जनगड भवताल

 गडावर अजून ही बरीच पाहण्यासारखी काही ठिकाणे आहेत उदाहरणार्थ अंग्लाई देवीचे मंदिर, रामघळ, अशोकवन इत्यादी पण त्यांचे वर्नार्ण परत कधी तरी नाहीतर हा ब्लोग बराच लांबेल...




मग आता आम्ही सरळ पुण्याच्या वाटेस लागलो आणि साधारण १२.३० च्या सुमारास कुलकर्णी वडे वाल्यांकडे भोजनासाठी थांबा घेतला. ..., आम्ही भाजणीचे थालीपीठ आणि पिठलं भाकरीचा आस्वाद घेतला तर इतरांनी मटणाचा आस्वाद घेतला आणि तिथून जे सुटलो ते थेट डोंबिवलीलाच थांबलो .....डेडली आणि अमेय दोघाही मात्तबर मंडळीनी १५०क्म/हर च्या स्पीड ने express way ला गाडी रेमटवली... पनवेल लागल्यावर सगळ्यांनाच जाणवले की परत आता नरकात चाललोय आणि त्याला काही इलाज नव्ह्ता (नंतरच्याच आठवड्यात मी गावाहून येत असताना गाडी पनवेल स्थानकात आल्या आल्या माझा चुलत भाऊ बोलला की आलो आता घाणीत परत ... ह्याचाच अर्थ कि शहरातलं आयुष्य  किती monotonus होत चाललंय आणि आपल्याकडे काहीही पर्याय नाहीये ते जगण्याशिवाय)... असो..पण आता आमच्या मनावर सज्जनगड आणि आजूबाजूच्या निसर्गाच्या सौंदर्याचा गारुड होतं जे आमच्या मनावर अजून काही दिवस राहणार होता आणि आमच्यासाठी पुढच्या पिकनिक पर्यंत टोनिक म्हणून काम करणार होतं...  आणि तसे वेळेत घरी पोहोचल्याने घराचे ही खुश असणार होते ..... भेटू लवकरच अशाच एखाद्या सहलीच वर्णन घेऊन  ... तोपर्यंत

                                                          II जय जय रघुवीर समर्थ II


पूर्ण फोटो (फक्त माझ्या कॅमेऱ्यातील) पाहण्यासाठी येथे क्लिक करा   :-

https://plus.google.com/photos/115038496210123492293/albums/6054513077283590945?authkey=COaTg6OE6rfITg